Wednesday, 26 November 2008

असेच काहीतरी

एक असाच काहीतरी अस्पष्ट विचार बर्च दिवस मनात चालला होता आज तो लिहुन काढला एव्हढच्


तुझी आठवण सांजवेळी,
मन माझे कातर करते |
हुदयातुन पुढे सरकत,
वेळीअवेळी डोळ्यात दाटते ||

पोटपाण्याच्या नित्यक्रमात,
काही तास निघुनही जातात |
कामाच्या गडबडगोंधळात,
काहि आठवणी विझुन जातात ||

दुपारच्या गडबडी नंतर,
संथ झुलत संध्याकाळ येते |
परत एकदा स्म्रुती जागवुन,
भावनांच्या म्रुगजळात नेते ||

पुन्हा मन पेटुन उठतं,
समंधालाही उधाण येतं |
चंद्र येतो सोबतिला अन्,
झुळुक वार्‍याची मंद वाहते ||

या मंद वार्‍याबरोबर,
आठवणीही कुंद होतात |
मला एकटाल्याच सोडुन,
कुठल्याकुठे वाहुन जातात ||

थोडे दिवस पुन्हा शांतता,
मिळत नाही कामातुन वेळ |
मोकळे झाल्यावर परत एकदा
दाटुन येते कातरवेळ ||

आठवणिंचा खेळ सारा,
येते भरती ओहोटी |
किनारे किती झिजावे,
बांधाची खरी कसोटी ||

लाटांच्या या मुक्त माराने,
किनारे टोकदार होतात |
थोडासा जरी धक्का लागला,
हातपाय कापत नेतात ||

संकटांची सोडून चींता,
सोडुन उधाणाची भिती ||
काढून टाक संरक्षक भिंत,
मिसळून जा लाटेसमती ||

सोडणार नाहीत आठवणी तुला,
परत येतील लाटेवरती |
अथांग मनाच्या सागरात,
क्वचित मिळतात माणिकमोती ||

येत राहते भरती ओहोटी,
पुन्हा गर्जून फेसाळ्ण्यासाठी |
वळुन मागे पाहता दिसतील,
कडूगोड आठवणगाठी ||

येइल परत पुन्हा संध्याकाळ,
आठवणिंना घेउन संगे |
मुक्त करुनी आठवणगाठी,
सोडुन दे त्या वार्‍यासंगे ||

चेतन

No comments: