Tuesday, 2 December 2008

(कधीच का नाही?)

जयश्री ताइंची कधीच नाही वाचुन आमची झोप उडाली आणि काय म्हणतात ते एक विडंबन पाडले (एक प्रयत्न)


का बंध रेशमाशी जुळले कधीच नाही
गात्रात कंप माझ्या भरले कधीच नाही

त्या सॉवळ्याच होत्या रात्री जागून माझ्या
वाह्यात वागणे मज जमले कधीच नाही

सलवार ही फुलांची मद झुलवीत येते
मज त्या लयीत झुलणे जमले कधीच नाही

डोळ्यात मोजलेल्या रात्री कितीक माझ्या
सत्यात भेटणे तुज जमले कधीच नाही

जखमा दिल्या नखाने, जपल्या बर्‍याच सार्‍या
का भाव तू दिलेले वठले कधीच नाही

पद सोडले सदा मी, सोडेन मी पुन्हा ते
का सोडणे तुला मज जमले कधीच नाही

चेतन

(काही कविता का प्रश्न ?)

रामदास भाउंच्या 'काही कविता' वाचल्यापासून मनात होतं की याच्या एक दशांश जरी काही लिहू शकलो तरी चिक्कार आहे. नंतर मग या कवितांवर चतुरंगांची चॉफेर टोलेबाजी आली.

आज दोन दिवस बातम्या आणि मिपावरील चर्चा वाचून डोक सुन्न झालं होतं. मनात आलं काहीतरी लिहावं आणि हे लिहलं. सद्यस्थिती पाहता याला वडंबन म्हणता येईल का याबद्दल साशंक आहे असो.

निर्ढावलेला बंडखोर
मुखडा आतंकाचा.
हवातसा हल्ला केल्यावर
हरामखोर हैवान झाला.
हक्काची मुंबई
मारायला मोकळा.
---------------
अल्लाद दाउदमिया आय्एस्आय् चा भामटा.
कराचित लपून पुन्हा पुन्हा
फोफावला लालकाळा
आता,
देशभर तंगडी तंगडी
------------------------
बारीक सारिक स्फोटांनी
देशातले एकेक शहर हादरवून
त्यानी विचारलयं
ठकूबाई,ठकूबाई,
जाणार कुठे गं
आता गोळ्या झाडल्यावर.
--------------------------------
एकेक वर्ष कोसळत गेलं
लोकलपासून ताजपर्यंत
पत्त्याच्या बंगल्यासारखं.
आबा पुरे झाल्या का
फुटकळ मुलाखती वांझोट्या.?

(अस्वस्थ) चेतन